डॉ. डी. वाय. पाटीलच्या जातीभेद करणा-या अधिका-यास तात्काळ काढावे – संदीप शिंदे

पिंपरी, दि. 2 (शफिक शेख) :- डॉ. डि. वाय. पाटील विद्यापीठात कमीत कमी तीन ते चार हजार काम करीत आहे. त्यांना असंख्य अडचनींना तोंड देत वरिष्ठांची मर्जी सांभाळत तारेवची कसरत करावी लागते. त्यात विद्यापीठमधील नवीन अधिकारी ऍनी फ्रान्सिस ही व्यक्ती ख्रिश्चन असुन फक्त ख्रिश्चन कर्मचाऱ्यांचीच भरती करत असून पात्रता नसताना त्यांना जास्त पगार दिला जातो. ही व्यक्ती मालकाच्या जवळील असल्यामुळे कामगार तक्रार पण करू शकत नाही. कारण न्याय मगणार तरी कोणाला? ही व्यक्ती हिंदू कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत असून भीती पोटी कर्मचारी तक्रार देत नाहीत, असा जातीभेद करणाऱ्या व्यक्तीला तत्काळ कारवाई करावी. कारण ही व्यक्ती अधिकाराचा गैर वापर करीत आहे. तसे न झाल्यास माझ्या जिवीत्वाच्या हानीस तुम्ही जबाबदार असाल, असे उपोषणकर्त्यांनी सांगीतले.

यापूढे बोलताना ते बोलले की वीस वर्षापासून काही कामगार काम करतात पण आजतागायत या कामगारांना कमी पगारात काम करून घेतले जाते, मेडीकलच्या देखील सूट्या मिळत नाही वयाचीसाठी पूर्न होवून ही काही मर्जीतल्या कामगारांना कामावर ठेवले आहे पण हिंदू व इतरांना न कळवता कसलेही आरोप करून काढून टाकले जाते. खोट्या केसमध्ये अडकुन त्यांना वकीलाकडुन धमकी दिले जाते. अशा कित्येक केस सूरू आहे. विस-बाविस वर्ष कामगार काम करुनही एका ही कामगाराला कायम केलेले नाही. विद्यापीठामध्ये ७०% कामगार हे sc/st/obc आहेत पण जातीवादा मूळे यांना कधीच पगारवाढ की इतर सूविधा मिळाल्या नाही ज्या ख्रिश्चन कामगाराला मिळतात. sc/st/obc कामगारांची निवृत्ती झाली पण त्यांना कुठल्याही प्रकारची ग्रॅझवेटी दिली नसुन अशा अनेक खटले उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.

उत्कृष्ट कामगार पुरस्कार आधिकारांच्या मर्जी मधील लोकांना दिला जातो जे कामगार ज्या अधिकार्यांाच्या घरची कामे करतात अशांनाच पूरस्काराचे मानकरी ठरवीले जाते. कंत्राटदार कर्मचारी असल्याचे कारणे सांगुन जबाबदारी झटकून दिली जाते. जेव्हां पासुन मेडिकल कॉलेज आणि हाॅस्पिटला परवानगी भेटली तेव्हां पासुन आज पर्यंत कोणत्याही कामगाराला दिवाळी बोनस दिला गेला नाही जो आमचा आधीकार आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडुन चौकशी करावी जेणे करून गरीब कामगारांना न्याय मिळेल.
असंख्य सरकारी कार्यालयात पत्रव्यवहार केला. सोबत पंतप्रधान कार्यालयासही पत्राद्वारे विनंती केली आहे.

कायदा सुव्यवस्थेच्या उद्भवणाऱ्या परिस्थितीला आपले विद्यापीठ व सरकार जबाबदार असेल माझ्या व माझ्या कुटुंबाला काही धोका व कमी जास्त झाले तर त्याला विद्यापीठ व पी डी पाटील सर व त्यांचे संपूर्ण कुटुंब व डिन सर तसेच एच. आर. जबाबदार असतील असे पत्राद्वारे त्यांनी कळवले आहे. अशा अनेक बाबी अमरण उपोषणकर्ता संदीप शिंदे यांनी सांगीतल्या या वेळी त्यांना पाठींबा देणारे सहकारी अजय स्वामी, सचिंन तापकिर, हर्षल उघाडे, रोहिदास कांबळे हे उपस्थित होते.

Leave a Comment

READ MORE