अखेर सत्याचाच विजय झाला – खासदार डॉ. अमोल कोल्हे

मुंबई, दि. 5 (महाराष्ट्र मंथन):- ‘‘मोदी’’ प्रकरणामध्ये दोन वर्षांची शिक्षा सुनावलेल्या राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांच्या बाजूने निर्णय देत राहुल गांधी यांच्या दोन वर्षांची सुनावलेली शिक्षा रद्द केली. याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करीत अखेर सत्याचाच विजय झाला! या विषयाने राहुल गांधी यांचे अभिनंदन केले आहे. तसेच राहुल गांधी पुन्हा एकदा त्याच जोमाने आणि ताकदीने संसदेत सामान्य जनतेचा आवाज बुलंद करतील, अशी सदीच्छा ही व्यक्त केली.

परंतु कोल्हे यांच्या या ट्विटवर अनेक लोकांनी नाराजीची आणि पातळी ओलांडून चुकीच्या शब्दांमध्ये त्यांना उत्तर दिले आहे आणि आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

READ MORE