हाथरस, दि. २ (वृत्तसंस्था):- उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये भोले बाबांच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी घटना घडली. यामध्ये 122 जणांचा मृत्यू झाला. 150 हून अधिक जखमी आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अपघातानंतरची परिस्थिती भयावह आहे. रुग्णालयाच्या बाहेर जमिनीवर मृतदेह विखुरलेले आहेत. सिकनारौ सीएचसी, हाथरसमध्ये 95 मृतदेह विखुरलेले आहेत. याशिवाय एटा सीएमओ उमेश त्रिपाठी म्हणाले – आतापर्यंत हातरसमधून 27 मृतदेह एटामध्ये आणण्यात आले आहेत. यामध्ये 25 महिला आणि 2 पुरुष आहेत. सीएमओ म्हणाले- मृतदेह आणि जखमींना टेम्पोमध्ये आणण्यात आले. मृतदेहांचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर पोस्टमॉर्टम केले जाईल. सत्संगात 20 हजारांहून अधिक लोकांची गर्दी होती.
हाथरसपासून 47 किमी अंतरावर असलेल्या फुलराई गावात हा अपघात झाला. अपघातानंतर कसेबसे जखमी आणि मृतांना बस-टेम्पोमध्ये भरून रुग्णालयात नेण्यात आले. सीएम योगी यांनी मुख्य सचिव मनोज सिंह आणि डीजीपी प्रशांत कुमार यांना घटनास्थळी पाठवले. घटनेच्या कारणाचा तपास करण्यासाठी एडीजी आग्रा आणि अलिगढ आयुक्तांची एक टीम तयार करण्यात आली आहे.
अपघातातील मृत आणि जखमींची संख्या इतकी जास्त आहे की, हाथरसच्या आसपासच्या जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिस आणि प्रशासनाची टीम अलीगडच्या जेएन मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचली आहे. जखमींना येथे हलवता येईल. तसेच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येणार आहेत.
भोले बाबांचे खरे नाव नारायण साकार हरी आहे. तो एटा जिल्ह्यातील पटयाली तहसीलमधील बहादूर नगरी या गावचा रहिवासी आहे. 26 वर्षांपूर्वी त्यांनी सरकारी नोकरी सोडून प्रचाराला सुरुवात केली. त्याने आपल्या प्रवचनात सांगितले होते की तो इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करत असे. साकार विश्व हरी भोले बाबा यांचे पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये अधिक अनुयायी आहेत.












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0