मुंबई, 27 मार्च : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील एका विधानाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. उद्धव ठाकरेंनंतर आता संजय राऊत यांनीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकर हा आपल्या आणि देशाचा श्रद्धेचा विषय आहे. अंदमानात 14 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा सोपी नाही. अशा टीकेला महाराष्ट्रातील जनता चोख प्रत्युत्तर देऊ शकते. आम्ही तुमच्या सोबत आहोत पण वीर सावरकर आमचे प्रेरणास्थान आहेत. राहुल गांधींनी वीर सावरकरांबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
वीर सावरकरांचे नाव ओढण्याची गरज नाही : संजय राऊत
ते गांधी आहेत, पण सावरकरांचे नाव ओढण्याची गरज नाही, असे संजय राऊत म्हणाले. सावरकर हे आमचे प्रेरणास्थान आहेत. आमच्या लढ्यामागे छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर आहेत.
तुमच्या शहरातून (मुंबई)
याशिवाय या मुद्द्यावर राहुल गांधींशी दिल्लीत समोरासमोर बोलणार का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता, मी नक्कीच त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन, असे ते म्हणाले. दरम्यान, या विधानानंतर भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींना माफी मागण्यास सांगितले होते, त्यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले होते की, माझे नाव गांधी आहे, सावरकर नाही आणि गांधी कधीच माफी मागत नाहीत.
आमच्या देवाचा अपमान सहन केला जाणार नाही : संजय राऊत
संजय राऊत यांच्या आधी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदींविरुद्धच्या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण वीर सावरकरांविरोधात एक शब्दही खपवून घेतला जाणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. खुले आव्हान देत उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचा पक्ष एमव्हीए महाविकास आघाडीत आहे. शिवसेना महाविकास अघाडीत आहे. कारण लोकशाहीच्या रक्षणासाठी ते एकजुटीने भाजपविरोधात लढत आहेत. एकत्र लढायचे असेल तर आमच्या परमेश्वराचा अपमान खपवून घेतला जाणार नाही.
वाचा – राऊतांवर टीका करताना संजय शिरसाटांची जीभ घसरली, नको ते बोलून बसले म्हणाले…
सावरकरांविरुद्ध काहीही खपवून घेतले जाणार नाही : उद्धव ठाकरे
सावरकरांच्या विरोधात एकही ओळ खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील जाहीर सभेतून दिला आहे. गुजरातमधील सुरत कोर्टाने 2019 च्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर लगेच राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली.
काय म्हणाले राहुल गांधी?
मानहानीच्या प्रकरणात खासदारकी रद्द केल्यानंतर शनिवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्यांना लंडनमध्ये दिलेल्या भाषणाबाबत प्रश्न विचारला असता राहुल गांधी चांगलेच संतापलेले दिसले. भाजप नेते तुम्हाला संसदेत माफी मागायला सांगत होते, मग तुम्ही माफी का मागितली नाही, असा सवाल राहुल गांधींना करण्यात आला. तुम्ही याबद्दल काय विचार करता? या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी उत्तर दिले की, ‘राहुल गांधींना वाटते की माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 8
Total views : 59570
Who's Online : 0